जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
जळगावमध्ये काही रेल्वे प्रवाशांना दुसऱ्या एका रेल्वे गाडीने उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. योद्धा एक्सप्रेस न्युज ऑनलाइन Updated: January 22, 2025 18:56 IST
प्रतिनिधी संदीप कोळी पाचोरा नगरदेवळा :-जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये काही प्रवाशांची मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.गुलाबराव पाटील काय म्हणाले?
परधाडे गावाजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्या. १५ ते २० मिनिटात प्रांत अधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहचत आहेत. घटनास्थळी पोहचायला जळगावहून ३० ते ४० मिनिटं लागतात. पण जोपर्यंत इथं कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी टीव्हा९ शी बोलताना दिली.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोक जखमी झाले किंवा त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले.
प्राथमिक माहितीनुसार, ११ ते १२ मृत्यकांचा आकडा सांगितला जात आहे. अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. सध्या आपली पाचोरा व जळगाव प्राथमिकता जखमींना उपचार देण्यातयेत आहे,रेल्वे आधिकाऱ्यांने सांगितलं नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, ” जळगावमध्ये लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा स्टेशनजवळ, अलार्म चेन पुलिंगची घटना घडली. या घटनेनंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने जात असलेली कर्नाटक एक्सप्रेस गाडी तेथून जात होती जिचा काही प्रवाशांना ट्रेनची धडक दिल्याची माहिती आम्हाला मिळाली”.
ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी आम्ही जवळच्या रुग्णालयांची मदत घेतली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत मिळाल्यानंतर लगेच पुष्पक एक्स्प्रेस देखील आपला प्रवास पुन्हा सुरू करेल”.