अहिल्यानगर जिल्हाआर्थिक घडामोडीउद्योग विश्वमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

श्रीगोंदा – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोमवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 2700 रुपये दर मिळाला . येथे शनिवार व्यतिरिक्त आठवडाभर कांद्याची आवक होत असते व दिवसातून तीन वेळा कांद्याचा लिलाव होतो . श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओडीसा , पश्चिम बंगाल , केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते . येथून बांगलादेश , दुबई , कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो .

मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेजारील कर्जत , दौंड , शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात . सोलापूर , कोल्हापूर , सांगली , पुणे येथील भावाप्रमाणे श्रीगोंदा येथे भाव मिळत असल्याने शेतकरी येथे आपला माल देणे पसंत करतात . कारण बेंगलोर , कोल्हापूर , सोलापूर , सांगली आदी ठिकाणी मालवाहतुकीसाठी येणारा खर्च वाचतो व दरही तोच मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी येथेच आपला माल देणे पसंत करीत आहेत . त्यामुळे दिवसेंदिवस आवक वाढत असल्याचे येथील संचालक व्यापारी लौकिक मेहता , गौरव पोखर्णा , दिपक भंडारी व मयूर बोरा यांनी सांगितले .
तालुक्यातील भानगाव , टाकळी लोणार , कोथुळ , कोसेगव्हाण , पिसोरे , तांदळी दुमाला , घोटवी , देऊळगाव , घुगलवडगाव , सुरोडी, वडाळी , चिंभळा , हंगेवाडी , बेलवंडी व परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून भरपूर उत्पन्न घेत आहेत . सध्या गुलाबी कांद्याची चांगली आवक असून दोन-तीन आठवड्यानंतर गावरान कांदा येण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले . सोमवारी झालेल्या लिलावा मध्ये एक नंबर चांगल्या प्रतीच्या कांद्यास 2700 रुपये भाव मिळाला , तर त्याखालील दोन नंबर कांद्यास पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला तर तीन नंबर कांद्यास त्यापेक्षा थोडा कमी भाव मिळाला . वाहतूक खर्च कमी लागत असल्याने शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा येथील बाजार समितीमध्ये कांदा देणे सर्व दृष्टीने फायद्याचे वाटते . येथील व्यापाऱ्यांनी मालाचे योग्य वजन , रोख पेमेंट व चांगली सेवा देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास वाढत आहे .
यापुढे कांदा मार्केट वर विशेष लक्ष देऊन नजीकच्या काळात काष्टी , कोळगाव व देवदैठण येथे उपबाजार सुरू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळ मार्केट उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले . ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ , वाहतूक खर्च वाचून त्यांच्या पदरात जास्त पैसे पडतील .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button