योद्धा न्यूज !! खरचं विजेचे दर कमी होतील?
प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्युज नासिक

प्रतिनिधी नासिक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत घोषणा केली की, नवीन विज धोरणांतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना व जे दिवसा विज वापरतील त्यांना 10 टक्के वीज दरात सवलत दिली जाणार आहे. हे ग्राहक आपल्या विजेच्या वापरावर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवू शकतील. आणि यामुळे राज्याच्या ऊर्जा बचतीला हातभार लागेल. जी विज 8 रुपयांना पडत होती ती आता केवळ 3 रुपयांना पडणार आहे. राज्यातील 70 टक्के ग्राहक हे 0 ते 100 युनिट वीज वापरणारे आहेत. सरकारच्या नव्या योजनेनुसार या ग्राहकांना सौरउर्जा प्रकल्पांतर्गत वीज मोफत मिळणार आहे. यासाठी अनुदान मिळणार असून याचा दिड कोटी ग्राहकांना वीज बिलाचा भार सहन करावा लागणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घोषणा जरी चांगली असली तरी प्रत्यक्षात खरचं विज दर कमी होतील का?
कारण, महावितरणने विज दरवाढीचा प्रस्ताव विज नियामक आयोगाकडे पाठविला असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात त्यांनी असे म्हटले आहे की, जे ग्राहक सौरउर्जा प्रकल्प उभारतील त्यांना फक्त 100 युनिटच विज वापरता येईल. जादा तयार होणारी विज महावितरणला 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकावी लागेल आणि त्यांना 100 युनिटच्या वर विज हवी असल्यास तिच विज महावितरणकडून 17 रुपये प्रति युनिट प्रमाणे विकत घ्यावी लागेल. म्हणजे आपण खर्च करुन सौरउर्जा प्रकल्प उभारायचा, विज उत्पन्न करायची आणि तिच विज महावितरणला स्वस्त विकून महाग विकत घ्यायची असा नवीन फंडा महावितरणने तयार केला आहे.
सरकारच्या माहितीनुसार 70 टक्के ग्राहक 0 ते 100 युनिट विज वापर करतात. म्हणजे या ग्राहकांना अनुदान देऊन सौरउर्जा प्रकल्प उभारायचे आणि त्यांची तयार होणारी जादा विज इतर ग्राहकांना विकायची असा याचा अर्थ होतो. शिवाय जे ग्राहक स्वखर्चाने सौरउर्जा प्रकल्प उभारतील त्यांच्याकडून सक्तीने 100 युनिटच्या वर असलेली विज 3 रुपये इतक्या कमी किंमतीत वसूल करुन त्याच ग्राहकाला ती 17 रुपयात विकली जाईल हे अन्यायकारक आहे. तसेच 100 युनिट विज वापरणाऱ्या ग्राहकाला 500 रुपये येणारे बिल त्यावर विज वापर झाल्यास 1500 रुपये बिल येणार आहे. हा त्या ग्राहकांना फार मोठा शॉक असेल. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विज दर स्वस्त करण्याची केलेली घोषणा आणि महावितरणने विज नियामक आयोगाकडे विज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव या दोन्ही बाबी परस्परांशी निगडीत आहेत. मग खरचं विज स्वस्त होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल की, सौरउर्जा प्रकल्पाच्या आडून ग्राहकांची लूट होईल हे येणारा काळच ठरवेल.
योद्धा न्यूज !! पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025 राजू वग्गू यांना जाहीर
हेही वाचा 👇
विमानाच्या काचा गोल का असतात ?
आपण अनेक वेळा प्रवासाला निघताना बस, रेल्वेचा वापर केला असेल. मात्र खिडकीच्या काचा या चौकोनी पाहिल्या असतील. मात्र, विमानाच्या काचा चौकोनी का नाहीत? असा कधी प्रश्न तुमच्या मनात तरी आला आहे का? आकाशात उडणारं विमान म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. या विमान नावाच्या यंत्राने जगात जन्म घेतल्या पासून सामान्य मनुष्याच्या समोर अनेक प्रश्नांचं जाळं उभं केलंय.
लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण विमाना विषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधात असतो. अश्याच बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे, विमानाच्या काचा गोल का असतात? ज्यांनी विमानातून प्रवास केला आहे, त्यांना देखील विमानात बसल्यावर हा प्रश्न नक्कीच पडला असणार. चला तर मग जाणून घेऊ या विचित्र प्रश्नामागचं शास्त्रीय उत्तर. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, विमानाच्या काचा या काही पहिल्या पासून गोल नाहीत. पूर्वी या काचा चौकोनी आकाराच्या होत्या. परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत, हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.
‘हेवीलँड कॉमेट’ या प्रसिद्ध विमानाचा १९५० मध्ये शोध लागला. त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या विमानाचा नावलौकिक होता. प्रवाशी क्षमते बाबत हे विमान इतर विमानांच्या तुलनेत सरस होते. विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते. पण त्यांच्या कडून एकच चूक झाली ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की, १९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटने मध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. अंती असे निष्पन्न झाले की, विमानाच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्या मध्ये हवेचा दाब निर्माण झाला. हवेच्या अति दाबासमोर काचा तगधरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या. परिणामी विमान खाली कोसळले. या घटनेनंतर होणारे अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला. या गोल काचांना कोपरे नसल्या कारणाने, काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसते.