क्राईम न्यूजतुळजापूरमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज !! 100 हून अधिक गायब, 200 जणांना नोटीस, 35 आरोपी… संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण नेमकं काय?

प्रतिनिधी समीर सनदी कोल्हापूर

प्रतिनिधी समीर सनदी – तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहे. सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजापुरात ड्रग्जमुळे दहशत पसरलेली दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 21 आरोपी फरार आहेत तर 14 आरोपी अटक आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे तुळजापुरातून शंभर लोक गायब झाल्याची माहिती मिळत आहे. तुळजापूर शहरातील 200 जणांना ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी नोटीसा दिल्यावर हे लोक गायब झाल्याचं बोललं जातं आहे.

तुळजापूर ड्रग्स प्रकरण नेमकं काय?
तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण चांगलंच फोफावलं. गेली अडीच वर्षांमध्ये जवळजवळ जवळजवळ दोन अडीच वर्षापासून तुळजापूरमध्ये ड्रेस विक्री आणि सेवन हे सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या ड्रग्स प्रकरणांमध्ये 14 फेब्रुवारीला पोलिसांनी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्जची पहिली कारवाई केली. त्यानंतर एक एकर तुळजापूरमध्ये आत्तापर्यंत 35 आरोपी ड्रग्ज प्रकरणांमध्ये निष्पन्न झाले. या निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये राजकीय पक्षाचे सदस्य असल्याने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले.

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीसोबतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर ही या प्रकरणातील आरोपींचे फोटो वायरल झाले. राजकारण आणि ड्रग्जचा बाजाराने तुळजापुरात अक्षरशः खळबळ उडाली आहे.

तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण, 100 लोक गायब

एकंदरीतच तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणाची पसरलेली दहशत ही खळबळ उडवून देणारी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातूनच पोलीस कारवाईच्या दहशतीने गायब झालेल्या लोकांबाबत पुजाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपीसोबत आर्थिक व्यवहार झालेले लोक भीतीमध्ये आहेत. याच भीतीतून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.

तुळजापुरात युवक, उद्योजक यांना पोलिसांच्या नोटीस पाठवल्या जात आहेत. बँक व्यवहार झालेल्या लोकांना नोटीस, कोणत्या न कोणत्या कारणाने बँक व्यवहार झाला, आपलं ही नाव ड्रग्ज प्रकरणात येईल अशी लोकांना भीती आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आरोपींनी आर्थिक व्यवहार ऑनलाईन करताना इतर आरोपींचे नंबर दिले, त्यावर काही लोकांचे व्यवहार झाले, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.

पोलिसांकडून नोटीस दिलेल्या लोकांचा ड्रग्ज प्रकरणात नेमका रोल काय हे निश्चित झालेलं नाही. भीतीपोटी तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती आहे. तुळजापुरातून गायब झालेला लोकांचा ड्रग्स खरेदी विक्रीमध्ये सहभाग होता की ते फक्त आर्थिक व्यवहार झाल्यामुळे गायब आहेत हे पोलीस तपासात समोर येईल

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचा घटनाक्रम

15 फेब्रुवारी 2025 : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले. काही आरोपींना अटक केली.

फेब्रुवारी 2025 अखेर: तपासादरम्यान, ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली. जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

मार्च 2025: पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली. ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.

योद्धा एक्सप्रेस ब्रेकिंग न्यूज!! जळगाव चाळीसगाव या ठिकाणी आगीचा भीषण अग्नी तांडव 50 लाखाहून अधिकची नुकसान

🎤 ही बातमी पण वाचा👇

 योद्धा न्यूज !! सोन्याच्या किमतीने रचला इतिहास! आता १० ग्रॅम सोन्यासाठी इतके पैसे लागणार     12 April, 2025, 09:04 AM

तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. सोन्याने आज आपला सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमतीत सुमारे २९९० रुपयांची वाढ झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत २,९१३ रुपयांनी वाढून ९३,०७४ रुपये झाली आहे, जी पूर्वी ९०,१६१ रुपये होती. त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत १,९५८ रुपयांनी वाढून ९२,६२७ रुपये प्रति किलो झाली. २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता. तर ३ एप्रिल रोजी सोन्याने ९१,२०५ रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता.

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,६०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,५५५ रुपये आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे.

कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८७,४५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९५,४०० रुपये आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला असून जागतिक मंदीची शक्यताही वाढली आहे. अशा परिस्थितीत, लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. कारण मंदीच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली.

या वर्षी रुपया सुमारे ४% ने घसरला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. लग्नसराईचा काळ जवळ येत असताना, सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे.

🎤 ही बातमी पण वाचा 🎤👇

योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह 

हॉरिबल…! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर…

तुम्हाला जर कोणी ७-८ तास टॉयलेटला जाऊ दिले नाहीतर किंवा जेवण करू दिले नाही तर, काय होईल. अशा ठिकाणी तुम्ही काम कराल का? रेल्वेने यासाठी रेल्वे चालविणाऱ्या लोको पायलटना ब्रेक मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एखाद्या तुरुंगातही एवढे टॉर्चर केले जात नसेल तेवढा त्रास या लोकोपायलटना सहन करावा लागत आहे.

रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे. किती हॉरिबल आहे, कर्मचाऱ्यांप्रती साधी माणुसकीदेखील दाखविण्यात आलेली नाही.

देशात रेल्वे अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर रेल्वेचा हा तुघलकी निर्णय आला आहे. एखाद्या लोकोपायलटला टॉयलेटला जायचे असेल तर त्याने सिग्नलवर गाडी थांबेपर्यंत तसेच थोपवून धरायचे, हे किती त्रासदायक आहे. ट्रेनचे संचालन बाधित होईल या एकमेव कारणासाठी रेल्वे बोर्डाने ही मागणी फेटाळली आहे.

याचबरोबर लोकोपायलटच्या केबिनमध्ये कर्मचाऱ्यांचा आवाज आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम देखील लावण्यात येणार आहे. याचाही बाजु या मंडळींनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या कृती आम्हाला रेकॉर्ड करायच्या नाहीत तर अपघात झाला तर त्याचे कारण शोधण्यासाठी आणि त्यावर अंमल करण्यासाठी हे केले जाणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

महिला लोकोपायलटने काय करायचे…

लोकोपायलटला शौचालयासाठी ब्रेक देण्याची सोय देण्यास नकार दिला आहे. अनेक सुपरफास्ट ट्रेन या ६-७ तास न थांबता धावत असतात. यावेळी पुरुषच काय तर महिला लोकोपायलटसाठी टॉयलेटला न जाण्यास देणे खूप अत्याचार करणारा निर्णय आहे. या ट्रेन आपत्कालीन परिस्थितीशिवाय कुठेही अधे मधे थांबत नाहीत, असे AILRSA संघटनेचे सचिव व्ही भालचंद्रन यांनी म्हटले आहे. या संघटनेने रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button