आर्थिक घडामोडीकोल्हापूर जिल्हाकोल्हापूर शहरधार्मिकमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमुंबईसामाजिक

योद्धा न्यूज जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवाचे आजपासून अन्नछत्र, ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा एक्सप्रेस न्युज (10 April, 2025, 09:09 AM)

चैत्र यात्रेला जोतिबा देवाच्या दर्शनाची आस घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी अहोरात्र अन्नदानाचे मोठे पुण्यकर्म करणाऱ्या सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र यंदादेखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. उपक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, १० ते १३ तारखेदरम्यान गायमुख येथे अन्नछत्र उभारले जात असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल, रोहित गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री जोतिबाची चैत्र यात्रा यंदा शनिवारी (दि. १२) होत आहे. यात्रेकरूंसाठी डोंगरावरील गायमुख परिसरात अन्नछत्रासाठी १५ हजार चौरस फुटांचा मोठा मांडव तसेच चहा व मठ्ठ्यासाठी वेगळा मंडप घातला आहे. येथे भक्तांना २४ तास चहा, तर दुपारी मठ्ठा दिला जाईल. बैलगाडी घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलांसाठी शेंगदाणा पेंड व भुस्सा दिला जाणार आहे. जेवण करण्यासाठी २० मुख्य आचारी, मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० महिला, ५० वाढपी भांडी धुण्यासाठी ७० महिला, ताटे स्वच्छ पुसून देण्यासाठी व इतर कामांसाठी ५० श्रमिक; तसेच जेवण वाढण्यासाठी विश्वस्त, स्नेही, हितचिंतक असे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत.

येथेच सीपीआर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिर तसेच नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. ज्या दानशूर व्यक्ती, संस्थांना या उपक्रमासाठी मदत करायची आहे, त्यांनी सहजसेवा ट्रस्ट, ३९८, आशिष चेंबर्स, बसंत-बहार सिनेमासमोर, स्टेट बँक कोषागार शाखा बिल्डिंग, शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे लागते साहित्य

बासमती तांदूळ : १५ हजार किलो, तूरडाळ : ३ हजार किलो, रवा : ६ हजार किलो, साखर : १० हजार किलो, तेलाचे डबे : ५००, दूध : ७ हजार लिटर, बटाटा : ३ हजार किलो, कांदा : ४ हजार किलो, चहा पावडर : ३०० किलो, मूग, काळा घेवडा : प्रत्येकी ३०० किलो, लसूण : २०० किलो, लाकूड : ४ टन, गॅस सिलिंडर : २००; याशिवाय ट्रक भरून भाजीपाला, गोडा मसाला, चटणी व इतर मसाल्याचे पदार्थ.

वाहनांची मोफत सेवा

कोल्हापूर वेध ट्रेनिंग टू व्हीलर मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून दोन दिवस ना दुरुस्त व पंक्चर झालेल्या दुचाकी वाहनांची मोफत सेवा देण्यात येणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून हे काम अखंडितपणे केले जाते. येत्या शुकवारी राधेय ऑटो, शनिवार पेठ येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ही सेवा शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस जोतिबा डोंगर येथे देण्यात येणार आहे.

खालील दिलेल्या सखा माझा सारथी 👇 या वेब सिरीज ला शेअर लाईक कमेंट करा फक्त चालकांच्या जीवनावर आधारित 

🔥🔥🔥 हेही वाचा 👇👇🔥🔥🔥

मोठा दिलासा! गृहकर्ज स्वस्त होणार; RBI कडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ​​काल बुधवारी (दि.९) पतविषयक धोरण समितीचा (MPC) चा निर्णय जाहीर केला. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यामुळे आता आरबीआयने रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीआय पतधोरण समितीने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून तो ६ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. हा दर तात्काळ लागू होईल, असे संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरु झाली होती. त्यानंतर आज रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.

याआधी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत, आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केली होती. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्राच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही पहिलीच दर कपात होती. तसेच जवळपास पाच वर्षांतील पहिलीच कपात होती. आता दुसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली.

आरबीआयच्या सहा सदस्यांच्या समितीने धोरणात्मक भूमिका आता तटस्थ ऐवजी अनुकूल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मल्होत्रा म्हणाले.

GDP Forecast | जीडीपी कसा राहील?

ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयच्या समितीने १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. “या नवीन आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज २० बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. जो जागतिक व्यापार आणि धोरणातील अनिश्चितता दर्शवितो,” असे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी रेपो दराचा निर्णय जाहीर करताना सांगितले.

गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा

रेपो दर म्हणजे व्याजदर असून ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा करते. कमी रेपो दरामुळे कर्जदारांना, विशेषतः घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळते. तसेच त्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होतो. आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो दर कमी झाल्याने बँका स्वस्त दराने कर्ज घेऊ शकतात. जर बँकांनी याचा लाभ ग्राहकांना दिला तर गृहकर्ज स्वस्त होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button