Breaking newsदिल्लीसामाजिक

योद्धा न्यूज!!‘ऑपरेशन सिंदूर’वर श्री श्रींची प्रतिक्रिया : संवादातून समजत नाही त्यांना धडा शिकवावा लागतो

प्रतिनिधी किरण पाटील मामा

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके आणि पाकिस्तानातील काही दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. भारताने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या हल्ल्याचे काही व्हीडीओही भारतीय सेनने सार्वजनिक केले आहेत असे असतानाच आता भारताच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तथा अध्यात्मिक गुरु श्री श्रकी रविशंकर यांनीदेखील भारताच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. संवाद, चर्चा केल्याने ज्यांना काहीही समजत नाही, त्यांना अशा प्रकारचे उत्तर देणे गरजेचे असते असे रविशंकर यांनी म्हटले आहे. परदेशात राहणारे मूळच्या भारतीय लोकांत सध्या घबराट आहे, भीती आहे. आता काय होईल? असे त्यांना वाटत आहे. आम्ही त्यांना वारंवार सांगत आहोत की सर्वकाही चांगले होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश योग्य निर्णय घेत आहे. त्यामुळे कोणालाही दहशतीत राहण्याची किंवा चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय की आपल्यासोबत देव आहे. सर्वकाही ठीक होईल अशी प्रार्थना करा. धीर धरा. सर्वकाही ठिक होत आहे अशी प्रतिक्रिया श्री श्री रविशंकर यांनी दिली

फक्त दहशतवादी तळांवर हल्ले
दहशतवाद हा मानवताविरोधी आहे. दहशतवादाला समूळ नष्ट करायला हवे. आपल्या देवी-देवातांकडे पाहा. आपल्या देवतांच्या एका हाता फूल आहे तर दुस-या हातात शस्त्र आहे. चर्चेतून, संवादातून ज्यांच्यामध्ये बदल होत नाही, त्यांना धडा शिकवावा लागतो. या बाबतीत भारताने मोठ्या विनयासह, समजदारीने पाऊल उचलले आहे. भारताने फक्त दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले आहेत. भारताची ही भूमिका प्रशंसनीय आहे अशी प्रतिक्रिया श्री श्री रविशंकर यांनी दिली.

 👇🔥ही बातमी ही वाचा 🔥👇

 योद्धा न्यूज!!नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी : पाकिस्तानातून मेल, पोलिस अलर्ट मोडवर

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये २५ भारतीय नागरिक तर १ नेपाळी नागरिकांचा समावेश होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील पाच दहशतवादी अड्डे भारताने उद्ध्वस्त केले आहेत, या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा धमकीचा मेल पाकिस्तानातून करण्यात आला आहे, या मेलमध्ये स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे देशातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, दरम्यान धमकीचा मेल आल्यानंतर आता पोलिस अलर्ट मोडमध्ये आले असून, पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेतला आहे, मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील ५ तर पाकिस्तानमधील चार दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली आहेत, या एअर स्ट्राईकमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे मात्र पाकिस्तान उलट्या बोंबा मारत असल्याचे दिसून येत आहे, जिथे एअर स्ट्राईक झाला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानने केला आहे, तसेच आमच्या २६ लोकांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. भारताने आमच्यावर नुसताच हल्ला नाही केला तर आमची मजाक उडवली आहे, आम्ही लक्षात ठेऊ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये बोलताना दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानला भारतासोबत युद्ध न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे

 ही बातमी ही वाचा 👇

 योद्धा न्यूज!!देशातील २५९ ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ यशस्वी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने विविध मार्गाने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे देशभरात २५९ ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ अर्थात युद्ध सराव करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्रातील १७ ठिकाणांचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे युद्ध सराव (मॉक ड्रिल) करण्यात आला आहे. देशाच्या सीमेवर असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या अनेक शहरांत युद्धसराव केल्या गेला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ यशस्वीपणे पार पडला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये संबंध ताणले असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश दिले होते. देशभरातील एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्धसराव केला जाणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती.

या सरावातून हवाई हल्ला झाल्यास इशारा देणा-या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआऊट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण भारतातील २५९ ठिकाणी तीन श्रेणींमध्ये ‘मॉक ड्रिल’ पार पडला असून पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी १३ शहरे, दुस-या श्रेणीत २०१ आणि तिस-या श्रेणीत ४५ शहरे होते. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत आहे. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे, तर उरण येथे माल वाहतूक करणारे जेएनपीटी बंदर आहे. तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तीनही ठिकाणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

मॉक ड्रिल कसे झाले?

गृह खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, १९६८ यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित असा सराव होता. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत, हे यातून दिसले आहे.

७ मे रोजी ठरलेल्या शहर, जिल्ह्यात राज्य आणि जिल्हा यंत्रणेच्या समन्वयातून युद्धसराव केल्या गेला. सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सरावासाठी सामावून घेण्यात आले होते. युद्धसरावादरम्यान वीज खंडित होणे, ब्लॅकआऊट, मोठ्या आवाजातील सायरन ऐकू आले. काही ठिकाणी सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी करण्यात आली होती. तर काही शहरांमध्ये वाहतूक वळवण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button