योद्धा एक्सप्रेस न्युज!!मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
YVCM Helping Foundation NGO संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ
योद्धा एक्सप्रेस न्युज!!मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार
प्रतिनिधी कोल्हापूर:- मराठा समाज आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे. आझाद मैदानावर हा मोर्चा जाणार असून पहिल्या मोर्चाच्या तुलनेत पाचपटीने अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. मात्र यावेळी मराठा आरक्षण भेटल्याशिवाय ”मुंबई सोडणार नाही” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
खेड तालुक्यातील चिंबळी येथे आयोजित बैठकीत जरांगे पाटील बोलत होते. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्च्याची रणनीती ठरविण्यात आली. मागील वेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईला नेण्यात आला होता. परंतु यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे कल्याण – ठाणे चेंबुरवरुन आझाद मैदानावर जाईल. मागील आंदोलनवेळी मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावर तोडगा निघाला नाही. आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही असेही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले.
माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठा समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन जाणार आहे. याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला असल्याचे सांगितले. त्यातच मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच असल्याने त्या समाजानेही जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या आगामी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
दोन भावांनी एकत्र यावं…
दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे कि “मुंबई पाहिजे तर ठाकरे पाहिजे”. कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं. पण कशासाठी म्हणत होते हे माहिती नाही असा टोला त्यांनी लागवला. दरम्यान राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत. मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा…
संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा. प्रमाणपत्र रोखुन धरु नका. अन्यथा वेळ वाईट येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.
ही बातमी ही वाचा 👇👇👇👇👇
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
योद्धा एक्सप्रेस न्युज!!SBI कडून Home Loan च्या व्याजदरात मोठी कपात! 10 वर्षांसाठी 50 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून अलीकडेचं या बँकेने आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात बदल केलेला आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसबीआयने देखील आपले होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे एसबीआय कडून होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसबीआयचे होम लोन व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया बाबत बोलायचं झालं तर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून किमान 7.50% इंटरेस्ट रेट वर होम लोन मंजूर होऊ शकते. मात्र होम लोन मंजूर करताना बँकेकडून विविध बाबींची पडताळणी केली जाते. कर्ज परतफेड करण्याची क्षमता, उत्पन्न, सिबिल स्कोर अशा वेगवेगळ्या बाबींची पडताळणी करून बँकेकडून कर्जाची रक्कम मंजूर होते.
10 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा एमी
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर दहा वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार? एसबीआयच्या होम लोन कॅल्क्युलेटर नुसार एसबीआय कडून जर किमान 7.50% व्याजदरात एखाद्या ग्राहकाला दहा वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर त्या व्यक्तीला 59 हजार 351 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
50 लाखासाठी किती व्याज?
दहा वर्षांसाठी 50 लाखांचे गृह कर्ज मंजूर झाले तर 59,351 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे म्हणजेच दहा वर्षांच्या काळात सदर ग्राहकाला 71 लाख 22 हजार 106 रुपये भरावे लागणार आहेत.
यामध्ये व्याज आणि मुद्दल यांचा समावेश आहे. अर्थातच सदर ग्राहकाला फक्त व्याज म्हणून 21 लाख 22 हजार 106 रुपये बँकेला द्यावे लागतील. पण जर एसबीआय कडून व्याजदरात बदल झाला तर कॅल्क्युलेशन देखील पूर्णपणे बदलणार आहे. तसेच या रकमेत प्रोसेसिंग फी व इतर चार्जेसचा सुद्धा समावेश नाहीये. यामुळे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे