योद्धा न्यूज !! सस्नेह निमंत्रण हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा – सन २०२५
प्रतिनिधी श्री प्रकाश दंडगव्हाळ (संपादक योद्धा एक्सप्रेस न्युज)

नासिक प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पराक्रमाने, नेतृत्वाने आणि प्रजाहितदक्ष राजवटीने भारताच्या इतिहासावर अमीट ठसा उमटवला आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी.
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा वर्ष २३ वे,सन २०२५
यंदा मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे. “शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्यदिव्य हलता देखावा”
•||कार्यक्रमांची रूपरेषा||•
‘शाहिरी शिवगर्जना’• भव्य पोवाड्याचा कार्यक्रम सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठिक ७.०० वाजता. (सादरकर्ते : सुप्रसिद्ध शिवशाहीर यशवंत जाधव)
शिवकालीन मर्दानी युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठिक ८:३० वाजता. (सादरकर्ते : सर सेनापती श्रीधनाजीराव जाधवराव प्रतिष्ठान, कोल्हापूर)
ठिकाण : श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरा शेजारी, शारदा शाळेच्या समोर, राणेनगर-राजीवनगर रस्ता, नाशिक.
नाशिक शहरातील मुख्य पारंपरिक मिरवणूक मार्गावरून भव्य मिरवणूक सोहळा (वाकडीबारव ते शिवतीर्थ, पंचवटी कारंजा)
बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी, दुपारी ४.०० ते रात्री १२.०० वाजे दरम्यान.
– स्वागतोत्सुक –
सौ. पुजा देशमुख । श्री. सागर देशमुख
हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार
शिवरायांचे विचार आजही प्रत्येक भारतीयाला संघर्ष करण्याची ऊर्जा देतात. त्यांच्या विचारांमधून शौर्य, नीतिमत्ता, आणि न्यायाचे मूल्यमापन करता येते. चला पाहुया काही अजरामर सुविचारः
“शत्रूच्या शक्तीचा आदर करा, पण स्वतःच्या क्षमतेला कमी समजू नका.”
“नेहमी डोके उंच ठेवा, कधीही खाली वाकू नका.”
“खरी सत्ता केवळ तलवारीच्या धारेवर नसते, ती निर्धाराच्या बळावर उभी राहते.”
“स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, जो कोणी ते हिरावून घेतो, त्याला प्रतिकार केला पाहिजे.”
“स्वतःच्या चुका शिकण्याइतपत शहाणपण असावे आणि दुसऱ्याच्या चुका टाळण्याइतपत बुद्धी असावी.”
“शूर माणसे ज्ञानी लोकांचा सन्मान करतात, कारण खरे धैर्य हे ज्ञानातूनच मिळते.”
“स्त्रीला मिळालेले मातृत्व हे सर्वश्रेष्ठ अधिकार आहे.”