योद्धा न्यूज !! कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात, कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा
माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

प्रतिनिधी नाशिक :- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनवाली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असे बोललं जात आहे.
आमदारकी रद्द होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर याला वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही, तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
दोन वर्षांची कारावासाची शिक्षा
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माहिती
२१ फेब्रुवारी संगीतकार अमितराज वाढदिवस जन्म –
‘दुनियादारी’ नंतर मराठी संगीतकार अमितराज सावंतच्या नावाची मराठी इंडस्ट्रीत चर्चा होऊ लागली. आपल्या गाण्यांतून तो नेहमी नवनवीन गायक गायिकांना संधी देत असतो. बॉलिवूड ते मराठी सिनेमा असा त्याचा प्रवास, संगीतकार म्हणून तरुणाईच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा याबद्दल त्याने ‘मुंटा’ शी गप्पा मारल्या.अमितराजने लहानपणा पासूनच संगीताचा अभ्यास केला आहे. पं.अभ्यंकर आणि विनोद भट यांच्याकडून त्याने संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. पण आई वडील कडक शिस्तीचे असल्याने आधी शिक्षण पूर्ण करून मग या तो क्षेत्राकडे वळला. अमितराजने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागला. एक दिवस अमितराजची मोंटी शर्माशी भेट झाली आणि तिथून त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. मोंटी शर्माने त्याला स्वतःहून त्याच्या सोबत काम करण्यासाठी विचारणा केली. व त्याने सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमितराजने ‘देवदास, अपने, वीर, लकी, सावरिया’ अशा काही महत्वाच्या चित्रपटासाठी त्याच्या सोबत काम केले. जवळपास सात वर्ष अमितराज त्याच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. काही वर्ष मोंटी बरोबर काम केल्या नंतर, मराठी मध्ये काम करायचं अमितराजने ठरवलं. त्याच्या कामाची सुरुवात टीव्ही मालिकेच्या शीर्षकगीताने झाली. ‘ओळख’ ही अमितराजची पहिली मालिका. पुढे ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ अशा अनेक मालिकांसाठी पार्श्वसंगीत त्याने संगीत दिलं. पुढे त्याला चित्रपट मिळू लागले. ‘विजय असो’ हा अमितराजचा पहिला मराठी सिनेमा. त्यानंतर त्याने ‘७२ मैल एक प्रवास’ हा राजीव पाटील यांचा चित्रपट केला. त्याचे सिनेमॅटोग्राफर संजय जाधव होते. त्यांना अमितराजची गाणी आवडली आणि त्यांनी त्याला ‘दुनियादारी’ साठी विचारलं. या चित्रपटातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ या गाण्याने अमितराजला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’ यासारखे चित्रपट अमितराजने केले. अमितराजने अनेक नवख्या गायकांना चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. एका कव्वालीसाठी त्याने दिव्यकुमार आणि रोंकिनी गुप्ता यांना मराठीत गाण्याची संधी दिली. त्याच्या आगामी एका चित्रपटात डेबोलीना बॅनर्जी ही एक नवी गायिका गाणार आहे. मराठीत सुद्धा त्याने अनेक नव्या गायकांना संधी दिली आहे. आदर्श शिंदे आणि त्याने केलेली सगळी गाणी हिट झाली. आनंदी, रोहित राऊत यांच्या बरोबर अमितराजने बरंच काम केले आहे. ‘क्लासमेट्स’साठी हर्षवर्धन वावरेने गायलेलं ‘यारियां’ सुद्धा तरुणाईला आहे