योद्धा न्यूज!! पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कारमधल्या ‘या’ 5 गोष्टी करा चेक, प्रवास होईल आनंदी
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
YVCM हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ
योद्धा न्यूज!! पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कारमधल्या ‘या’ 5 गोष्टी करा चेक, प्रवास होईल आनंदी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून वेळेआधीच सुरू होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिसाला मिळणार आहे. तसेच जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरेजेचे आहे. पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
गाडीत गळती नसावी
मान्सूनपूर्व हंगामात गाडीमध्ये गळती आहे की नाही हे तपासले पाहिजे. पावसाळ्यात अनेकदा गाडीच्या अनेक भागातून गळतीची समस्या उद्भवते. अशावेळी मान्सूनपूर्व काळात गाडीची नीट तपासणी करा. ज्यामुळे गळती होणार नाही.
ब्रेक
उन्हाळा असो किंवा इतर कोणतेही हवामान, गाडीचे ब्रेक नेहमीच कार्यक्षम असले पाहिजे. मान्सूनपूर्व काळात गाडीची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात ब्रेकची घर्षण क्षमता कमी होते हे अनेक वेळा दिसून येते. अशावेळी जर ब्रेक चांगले नसल तर दुरुस्त करून घ्यावे.
ए.सी.
पावसाळ्यात कारमध्ये एसी आवश्यकता नसते.अस वाटत असेल तर चुकीचे आहे. कारण उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही कारमध्ये एसीची गरज असते. पावसाळ्यात कार एसी त्याच्या डिफॉगर फिचरसाठी खूप खास आहे.
टायर्स बदलून घ्यावे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारचे टायर बदलून घ्यावे. गाडीचे संपूर्ण वजन टायर्सवर असते, त्यामुळे टायर्सचा हवेचा दाब अगदी अचुक असावा. यामुळे प्रवासादरम्यान समस्या येणार नाही.
वायपर तपासा
जर तुम्ही नेहमीच कारने प्रवास करत असाल तर मान्सूनपूर्व काळात वायपर तपासून घ्यावे. ते नीट काम करत आहे की नाही ते तपासावे. पावसाळ्यात दृश्यमानता कमी होते आणि अशावेळी वायपर चांगले असणे गरजेचे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वायपर सुधारावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. योद्धा एक्सप्रेस न्यूज योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र खंड भारत माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.