योद्धा एक्सप्रेस न्युज!!’जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन’
प्रतिनिधी मुख्य संचालक श्री प्रकाश दंडगव्हाळ नाशिक

YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ
योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन
योद्धा एक्सप्रेस न्युज!!’जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन‘
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आज पुणे (Pune) न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत हगवणेंच्या वकिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. अज्ञात व्यक्तीसोबत वैष्णवीच्या व्हॉट्सअप चॅटचा दाखला देत तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हगवणेंचा निषेधही व्यक्त केला.
आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, पोलिस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. हगवणेंकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या मामांनी आपली बाजू माध्यमांसमो मांडली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही यात उडी घेत थेट वकिलांवर हल्लाबोल केला आहे. जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
वैष्णवी प्रकरणात न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना वैष्णवीचा छळ करण्यात आला नसल्याचे हगवणेंच्या वकिलाने म्हटलं.
एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नाही, ही मिडीया ट्रायल सुरु आहे, असे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. त्यावरुन, रोहणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली आहे. जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सुनावणीवेळी हगवणेंच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत, त्यावर आता कस्पटे कुटुंबीयांनी बाजू मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो.
कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, पोलिस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. हगवणेंकडून केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
कुठलंही चॅटिंग झालं नाही, आरोप खोटे – वैष्णवीचे मामा
आमच्या वकिलावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, अशा प्रकारचं कोणतंही चॅटिंग झालं नसल्याचं आम्ही स्पष्ट करतो.
आम्ही कोणाचाही मोबाईल काढून घेतलेला नाही. वैष्णवीचा मृत्यू 16 तारखेला झाला. मी स्वतः 17 तारखेला फोन करून बाळाची विचारणा केली होती. माझं करिष्मासोबत बोलणं झालं होतं. तेव्हा, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मेव्हणीने सांगितलं की बाळ रडतंय, त्याला घेऊन जा, अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमांना दिली. तसेच, ही एकतर्फी प्रेमाची बाब होती, पण दुसऱ्या बाजूला पैशावर प्रेम होतं असेही त्यांनी म्हटले. मामांनी पुन्हा एकदा पैशांचा मुद्दा उपस्थित करत हगवणेंकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न – मोहन कस्पटे
असा कोणताही प्रकार घडलेला नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. वकिलांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, चॅटिंग आणि इतर आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणात आता काही नवे सापडत नाही, म्हणून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी म्हटलं आहे. आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. जे हक्क त्यावेळी सोडले गेले होते, तेव्हाच वैष्णवी आमच्याकडे होती, असेही वैष्णवीच्या काकांनी वकिलांच्या आरोपावर आणि कोर्टात हगवणे कुटुंबीयांनी केलेल्या दाव्या संदर्भाने बोलताना म्हणाले.
सारथी योद्धा फिल्म प्रोडक्शन 👇 सर्वांनी एकदा बघा लाईक सबस्क्राईब व शेअर करा
योद्धा एक्सप्रेस न्यूज ची ही बातमी वाचा 👇👇
योद्धा एक्सप्रेस न्यूज!!राज्यात पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे ४९ हजार हेक्टरचे नुकसान
मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपले असून राज्यातील ४९ हजार, २२८ हेक्टरवरील उन्हाळी पिके, भाजीपाला, फळांचे नुकसान केले आहे. १ मे ते २८ मे दरम्यान राज्यात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक अमरावती, बुलडाणा, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, अकोला, चंद्रपूर, जालना आदी जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.
पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोकणातील भातरोपांसाठी टाकलेल्या रोपवाटिकांचेही (तरवा) नुकसान झाले आहे. राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीला ब्रेक लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी दलदल असल्याने खरीपपूर्व मशागत करता येत नाही. जून महिन्यात मॉन्सूनचे आगमन होणार असून सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्वमोसमी पावसाने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटविली असली तरी उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळांचे मोठे नुकसान केले आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून अचलपूर, भातुकली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, अमरावती, वरूड, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यांतील मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्रा आदी पिकांचे मोठे ८ हजार ८५६ एकरांवरील क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात ४,५३८ एकरांवरील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अंमळनेर, पाचोरा या तालुक्यांतील मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, कांदा, केळी, पपई, आंबा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, सटाणा, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, मालेगाव, दिंडोरी, येवला, कळवण, नाशिक, इगतपुरी, चांदवड, नांदगाव या तालुक्यांतील ३,५३४ एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. येथे बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, राहता, जामखेड, कर्जत, पारनेर, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, अहिल्यानगर, अकोले आदी जिल्ह्यांत ४,४५० हेक्टरवरील बाजरी, कांदा, पपई, भाजीपाला, चिकू, आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान झाले आहे.
अकोला तालुक्यासह बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, बाळापूर या तालुक्यांतील २,४३५ हेक्टरवरील कांदा, लिंबू, ज्वारी, तीळ, भूईमूग, मूग, उडीद, केळी, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यासह अंबड, मंठा, बदनापूर, परतूर तालुक्यांतील पपई या पिकांचे १,७२६ हेक्टरवर नुकसान झाले आहे.
अन्य जिल्हे (नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये)
पालघर (७९६), रायगड (४२), ठाणे (४७), संगमेश्वर (१), सिंधूदुर्ग (५), धुळे (६४५), नंदूरबार (१४४), पुणे (६७६) , सातारा (७३), सांगली, (१०), कोल्हापूर (९५), लातूर (९५७), धाराशीव (२३५), छत्रपती संभाजीनगर (४५६), बीड (१०),परभणी (३३८), नांदेड (७), हिंगोली (६०), यवतमाळ (२९०), वाशिम (२२४), वर्धा (२८१), नागपूर (४२), भंडारा (४६१), गोंदिया (१४२), गडचिरोली (३४२)